नवरा-बायकोच्या भांडणात नेहमीच एकमेकांवर वेगवेगळे आरोप होतेच असतात.मात्र यावेळी एका पतीने आपल्या पत्नीवर विचित्रच आरोप केला आहे.त्याने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत पोलिसांना जे सांगितले ते ऐकून कठोर मनाच्या पोलिसांच्याही मनातील हळवा माणूस जागा झाला आहे.
कर्नाटक मधील बंगळुरुमध्ये पती-पत्नीच्या आपसी वादाचे केवळ हैराणच नव्हे तर विचार करायला लावणारे एक प्रकरण समोर आले आहे. पतीने पत्नीवर गंभीर आरोप केले असून ती आपल्या लग्नाच्या पतीला तिच्या सोबत झोपण्यासाठी दिवसाचे ५,००० रुपये मागत असल्याचा आरोप चक्क तिच्या पतीनेच करून त्यासाठी त्याने चक्क पोलिस स्टेशन गाठून आपली कैफियत मांडली आहे. इतकेच नाहीतर पत्नीला मूलबाळ देखील नको आहे,असा सुद्धा नवऱ्याने तिच्यावर आरोप केलेला आहे. पत्नीने सुद्धा पतीवर हुंडा मागणे, जेवण न देणं आणि मारहाणीचे आरोप केले आहेत. पोलिसात दोघांकडूनही तक्रार दाखल झाली असून पोलीस याचा तपास करत आहेत.
पत्नी फक्त लग्नासाठी तयार झाली, तिला मूलबाळ नको आहे,असा पतीचा आरोप आहे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पतीने पत्नी विरोधात तक्रार नोंदवली आहे.त्यात त्याने आरोप केला की, पत्नी रोज सोबत झोपण्यासाठी दिवसाचे ५,००० हजार रुपये मागते.
स्पर्श करु नको, केल्यास सौंदर्य खराब होईल. अशी पत्नी धमकी देते. पतीने पत्नी विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार बंगळुरुच्या श्रीकांतचे लग्न बिंदुश्री सोबत २०२३ मध्ये झाले आहे. लग्नानंतर दोघांमध्ये वादावादी सुरु झाली. श्रीकांतने पत्नी विरोधात पोलीसात तक्रार नोंदवली तेव्हा श्रीकांतने त्यांच्या लग्नाला दोन वर्ष झाल्याचे सांगितले.
पत्नी सोबत झोपण्यासाठी पैशांची मागणी करते तिला स्पर्श केल्यास सुसाइड नोट लिहून जीवन संपवेन अशी धमकी देते असाही श्रीकांतचा आरोप आहे.
श्रीकांतने व्यालिकावल पोलीस स्टेशनमध्ये पत्नी विरोधात तक्रार नोंदवली आहे. त्यात त्याने म्हटले की पत्नी हातात बांगड्या आणि पैजण सुद्धा घालत नाही.पत्नी बिंदुश्रीने सुद्धा पतीवर अनेक आरोप केलेत. पती आणि सासरचे लोक तिच्या सोबत चुकीचा व्यवहार करतात असा तिचा आरोप आहे. तिला व्यवस्थित जेवायला देत नाहीत, मारहाण करतात असा तिचा आरोप आहे. तिने मीडियाला सांगितलं की, वडिलांनी माझ्या लग्नात ४५ लाख रुपये खर्च केले. मात्र तरीही सासरकडचे लोक हुंड्यासाठी त्रास देतात.या सगळ्या त्रासाला कंटाळून मी माहेरी निघून गेली,असे बिंदुश्रीने सांगत सासरी परत आल्यानंतर पुन्हा कुटुंबीय तसेच वागले असही तिचे म्हणणे आहे...



0 टिप्पण्या